Wednesday 11 January 2017

ग्रामीण जीवन कौशल्य विकास कार्यक्रम



Problem based learning



आपणास भूक लागते म्हणून जेवण मिळवण्यासाठी सगळे धडपड करत असतात. हा जीवन सृष्टीचा अलिखित नियम आहे. पण थोडा वेगळा विचार शिक्षण क्षेत्रात केला तर असे दिसून येते की सद्या मुलांना आपण जबरदस्तीने काही गोष्टी भरवत आहोत. किंवा असं म्हणता येईल त्यांना शिकण्याची भूक लागत नाही.मग ही शिकण्याची भूक कशी वाढवावी हा विचार झाला. तेव्हा त्या गोष्टीचा मूळ म्हणजे समस्यावर आधारित शिकणे  हा विचार झाला व समस्या आधारित शिक्षण सध्या  आम्ही  देण्याचा प्रयन्त करत आहोत. यासाठी कृतीतून शिक्षण हे तर वापरयचं आहेच. पण या कृती ला समस्येची जोड देणे हा प्रयन्त चालू आहे.

मग समस्या म्हणजे काय ? त्या सोडवण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात ? इथं पासून सुरुवात करून काही कृत्रिम समस्या तयार करून त्या मुलांकडून सोडवून घेण्याचा आम्ही प्रयन्त आहोत. उदा. मुलांना प्लस्टिक गाल्सचा पराशुट, कागदाच घर इ. त्यावर आधारित समस्या  देणे त्या सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमता विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयन्त करत आहोत. आमच्यासाठी सद्या  कोल्हापूर जिल्हातील सहा जिल्हापरिषद मराठी शाळेमध्ये हा उपक्रम सुरु आहे.हा उपक्रम राबताना बरेच चांगले वाईट अनुभव येत आहेत. 

समस्या या विषयाला सुरुवातीला करताना देश , राज्य व गाव व स्व:तच्या आयुष्यातील समस्या हे ब्रेन स्रामिंग मध्ये एका विद्यार्थाने  खाजगी शाळा वाढणे ही समस्या सांगितली मी त्याला  ही समस्या का वाटते असा प्रतीप्रश्न केला तेव्हा समजले.तेव्हा तो म्हणला आम्ही खाजगी शाळेची फी देवू शकत नाही त्यामुळे सरकारी शाळेत शिकतो गेल्यावर्षी माझे बरेच मित्र ही शाळा सोडून गेलेत म्हूनण मला ही समस्या वाटते. अस उत्तर त्याने दिले. त्यां मुलाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. मग आम्हला कामाची  नेमकी दिशा दिसू लागली आहे.

दोन दिवशीय कार्यशाळेने गुणवत्ता वाढ होणार नाही हे नक्की आहे. पण ती शाळा आमच्या प्रकल्पाला पूरक आहे की हीच प्राथमिक पाहणी या दोन दिवशीय कार्यशाळेतून करता आली. आता दीर्घ काळातील कार्यक्रम लवकरच या ग्रामीण सरकारी  शाळामध्ये सुरु करून  गुणवत्ता विकास घडवून आणणे च पुढील ध्येय. !!!

धन्यवाद !!!    



No comments:

Post a Comment