Tuesday 10 October 2017

पाऊली चालती मेळघाट ची वाट !!! 

सृजन यात्रा – २०१७

माहित नाही पण मला मेळघाट ने जीवनाचा मेळ कशात आहे याची जाणीव करून दिली तर  घाट सांगून गेला तूला  आयुष्यची खूप वळण बघायची आहेत. माझा सृजन यात्रेच दुसरा अनुभव !!! प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. याची पुन्हा प्रचीती परत आली.

मेळघाट म्हटलं की सगळयांना आठवतो महाराष्ट्रतला वेगवेगळ्या प्रश्नांनी व्यापलेला  प्रदेश जिथे  कुपोषण, बालमृत्यु , वेगवेगळे साथीचे रोग, अंधश्रद्धाळू आदिवासी लोक, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, बंद  पडलेल्या शाळा, घनदाट जंगल आणि घाटाचा रस्ता. पण माझ्या नजरेतून पाहिलेला मेळघाट थोडा वेगळा होता.


आपल्याकडे नद्या वाहत आहेत पण पाणी प्रदुषित. आपल्याकडे घर आहेत पण त्यात इतरांना प्रवेश नाही. आपल्याकडे पंचतारांकित हॉटेल आहेत पण पौष्टिक आहार नाही. आपल्याकडे आधुनिक वैद्यकीय साधने आहेत पण त्यात गरिबाचे उपचार नाकारले  जातात. आपल्याकडे मुलांना शिक्षण दिले जात पण पाचवीचा मुलाला पहिलीच वाचता येत नाही सांगणारा असर अहवाला निघतो. मग मागास कोण ?? आपण का ते असा प्रश्न मनात येवून जातो.
सृजन यात्राते भेटलेल्या प्रत्येक Role मॉडेल आंम्हाला हेच सांगत होता की इथं आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न आहेत. आम्ही ते सोडवयाला आलो खरे पण याच लोकांनी आम्हाला खूप काही शिकवले.जीव लावणे म्हणजे काय असत हे डॉ. रवींद्र कोल्हे सांगत होते. आदिवासी लोकांनी त्यांना बाधून दिलेलं घर. त्याच्या मुलांची घेतलेली  काळजी, ते M.D करण्यासाठी बैरहगड सोडताना चाळीस किमी अंतर सपूर्ण गाव सोडायला हरिसाल या बस असणाऱ्या गावात पर्यत आला हे सांगताना त्यांना गहिवरून आले.

डॉ. आशिष सातव यांच्या महान ट्रस्ट च्या  कधीही शाळेत न गेलेल्या पण उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिलांनी तर आमच्या सगळ्याची मने जिंकून घेतली.व जीवन शिक्षणाचा नवा मंत्र आम्हा यात्रेकरूना आला. चिलाटी सारख्या अतिदुर्गम भागात मेळघाट मित्रच काम सुरु आहे रामभाऊ, मधुभाऊ, चंदूभाऊ जाऊन इथे राहतात व धडक मोहिमेच्या माध्यामातून अनेक युवकांना स्वत:ला ओळखण्याची संधी उपलब्ध करून देतात. बोकोमित्र व आयोग्य मित्र व गावमित्र बनवून आदिवासी कोरकू मित्रांना सक्षम करतात.हे मित्र जेव्हा सरकारी यंत्रणा विरुद्ध बंड पुकारतात तेव्हा खऱ्या चळवळची परिभाषा कळली.

ज्यांना समाज्यान नाकारलं अशा अनाथ मतीमंद मुलांना एकत्रीत  करून एकही कामगार न ठेवता १२३ मुलाचा बाप बनणारा शंकरबाबा पापळकर हे सांगत होते एक समाजसेवा करायची असेल तर पुर्नवसन महत्वाचे आहे.त्यांनी अशा मुला-मुलीची लग्न करून दिली.हे पाहून परत समाजसेवेचा अर्थ नव्याने कळल.

आदिवासी भुकेन मरत नाहीत तर अन्यायने मरतात.यासाठी त्यांना कायदाचे हक्क मिळवून देणारी खोज संस्थेने अजून  एक बाजू आमच्यासमोर ठेवली. समाज सेवाची वेगवेगळी अंगे असतात. जशी गरज आदीवासी भागात आहे. तशी शहरात सुद्धा माणस आहेत व त्यांनाही मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचे काम डॉ. अविनाश सावजी सर प्रयास सेवांकुर च्या माध्यामातून करत आहे. आणि स्व:ताची नोकरी सरकरी शाळेची नोकरी सोडून फासेपारधी समाजाचा युवक मतीन भोसले याने  ज्यांना समाजाने चोर म्हणून वाळीत टाकल ज्यांना राहयाला घर नाही, खायला अन्न नाही, घालायाला कपडे नाहीत अशा अनेक प्रश्नची उत्तरे शिक्षणाच्या माध्यामातून सोडवण्यासाठी ४४६ मुलामुलांची प्रश्नचिन्ह शाळा याला नक्कीच उत्तर बनेल. असं ती शाळा पाहून वाटते .मेळघाटामध्ये  आम्हला वाघ भेटला नाही पण वाघाच्या तोलामोलाची काम करणारी ढाणे वाघ प्रवृतीची  माणसे नक्की भेटली अस म्हणायला हरकत नक्कीच नाही. 

या प्रत्येक व्यक्तीच्या कामाबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिता येईल.पण वाचून हा अस्पर्शित भागाचा स्पर्श कळणार नाही.एकदा अवश्य भेट द्या.तुम्ही जरूर म्हणाल पाऊली चालती मेळघाट ची वाट !!!

धन्यवाद !!!
विनायक माळी
विद्योदय मुक्तांगण परिवार, कोल्हापूर


Tuesday 30 May 2017

युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७


   युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७
 मी कडून...आम्ही कडे नेणारा रोमांचकारी प्रवास...

विद्योदय मुक्तांगण परिवारमार्फत दरवर्षी युवा चेतना निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.. हे शिबिराचे ३ रे वर्ष होते..

खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात .आयुष्यात काही तरी वेगळे, काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठीसुद्धा काहीतरी करावे असे बऱ्याच जणांना वाटत असते

आजच्या युवकांना प्रशासकीय, उद्योजक, संरक्षक व शेती क्षेत्रात यशस्वी झालेल्या व उत्तम कार्य करत असलेल्या व्यक्तीचा जीवन प्रवास समजावा, त्यांचा युवकांशी सवांद व्हावा व त्यांतून युवकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी या हेतूने युवा चेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले . हे दोन दिवशीय निवासी शिबीर दि.२७ व २८ मे २०१७ रोजी बालोद्यान या वसतिगृहात पार पडले. सदर शिबीरामध्ये ५० युवकांचा समावेश होता. शिबीराचा थोडक्यात वृत्तांत पुढील प्रमाणे
 वकांना सामाजिक
दिवस पहिला २७ मे , २०१७
    शिबिराचा दिवस म्हणजेच शनिवार २७ मे उजाडला. हळू-हळू शिबिरार्थींची नोंदणी सुरु झाली.१०.३० पर्यंत नोंदणी करून सर्व दादा-ताई बालोद्यान मध्ये एकत्र जमले. ओंकाराने शिबिराची सुरुवात झाली. विनायक दादाने एक खेळ घेतला त्या खेळामध्ये सर्वांची ओळख झाली..


 पहिले सत्र -  मा. बाबासाहेब नदाफ
अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे ज्यांनी संपूर्ण भारतभर व्याख्यानासाठी प्रवास करणारे राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री, हेरवाड गावचे सुपुत्र मा.बाबासाहेब नदाफ सर यांचे हेरवाड सारख्या लहान गावातून जन्म घेवून राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री असा प्रवास सरांनी ठेवला. त्यांची समजाप्रती असणारी तळमळ, तिहार जेल मध्ये त्यांची साजरी केलेली भगतसिंगची जयंती असा सगळा प्रवास एकूण सगळे साजरी केलेली माहिती दिली. लहानपणी केलेला संघर्ष यापासुन नक्कीच प्रेरणा मिळाली.



दुसरे सत्र- सौ पद्मावती संजय गिरमल
  आपल्या स्वकर्तुत्वाने आज त्या लाट गावातील यशस्वी आधुनिक महिला शेतकरी म्हणून परिचित आहेत..एखादे ध्येय ठरवायचे व ते पूर्ण करण्यासाठी खुप कष्ट करायचे हा मूलमंत्र त्यांनी सर्व दादा-ताईंना दिला. शेती व्यवसाय हा महत्वाचा आहे. जर डोक वापरून शेती केली तर त्याच्या सारखे उत्पन्नाचे साधन नाही अशी नवी दिशा त्यांनी युवकांना  दिली.



पारंपारिक खेळ -

जे खेळ कुठेतरी काळाच्या आड हरवत चालले आहेत असे खेळ सर्वांनी मिळून गटा-गटामध्ये खेळले .खेळामध्ये विटी-दांडू, लगोरी, रस्सीखेच या खेळांचा समावेश होता.सगळ्यांना आपले बालपण आठवले.



तिसरे सत्र – मा.इंद्रजीत देशमुख व गोरख माळी सर
      

सर्व जण या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते..कारण होते हि तसेच. ज्यांना आम्ही आदर्श स्थानी मानतो,आपल्या अमृत वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे,प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी,काकाजी म्हणजेच डॉ.इंद्रजीत देशमुख (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प.,कोल्हापूर) आणि त्यांच्या सोबत होते आयर्न मॅन हा सन्मान दोनवेळा प्राप्त करणारे गोरख माळी सर काकाजी व माळी सरांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला.. या सत्रासाठी 7 वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या युवकापर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती..त्यामध्ये आपले लाडके पण तितकेच शिस्तप्रिय असणारे मुख्याद्यापक गडकरी सर,साहित्यिक कुरुंदवाडे सर हे युवक युवा शिबिरासाठी आवर्जून उपस्थित होते..सलगतीन तास सगळे एका जागी खिळून होते..


मनोरंजन सत्र -
      रात्री भोजन करून परत दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो. तयारी झाल्यानंतर अक्षय दादांनी आपल्या कवितेने सर्वांना भारावून सोडले..


दुसरा दिवस- रविवार २८ मे

 एरोबिक  -
  सकाळी ठीक ६ वाजता नदाफ सर बालोद्यान मध्ये हजर होते.. सरांनी सर्वांना अप्रतिम पध्द्तीने एरोबिक शिकवले. संगीताच्या तलावार व्यायाम करताना युवकांनी खूप आनंद घेतला. सरांनी  व्यायाम व एरोबिक चे महत्व सांगितले.






लाटी काटी व दांडपट्टा प्रशिक्षण -गावातील देवा फौंडेशन मार्फत लाठी-काठी व दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक चौगुले यांनी अप्रतिम पद्धतीने दिले.लाटी व दांडपट्टा मुलीच्या हाती भारी शोभत होत्या.२१ शतकातल्या रणरणरागिणी जणू...

    



श्रमदान – बालोद्यान च्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व बालोद्याच्या मुलाच्या सायकली ठेवण्यासाठी मोडकळीस आलेला पत्राचा शेड दुरुस्त करण्यात आला . त्यानंतर श्रमदान करून झाल्यावर आवरून नाष्टा करून सर्वजण १०.०० वाजता एकत्र जमलो.




प्रभातभेरी  -
युवा शक्तीचे महत्व सांगणारी , युवकांना दिशा देणारी घोषवाक्ये लिहून गावात प्रभातफेरी काढण्यात आली.युवा वर्गाला संघटित करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या.





 सत्र चौथे - बळवंत नायकूडे व श्रीकांत प्रभुदेसाई  
  सामाजिक उद्योजकता यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इचलकरंजीचे प्रसिद्ध उद्योजक मा.श्रीकांत प्रभू देसाई सर व लाटेतील गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष मा.गणेश नायकुडे सर उपस्थित होते... दोघांनी आपला जीवनप्रवास सांगितला..
आपण व्यवसाय करत समाजसेवा करू शकतो. व नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनले पाहिजे हा मुलंमंत्र त्यांनी दिला.

सत्र पाचवे – अभिजित कुंभोजे
अब्दुल लाट गावातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असेलले अभिजित कुंभोजे व त्यांच्या साथीदारांनी संरक्षण क्षेत्रातील संधी सांगितल्या व सद्या संरक्षण क्षेत्रात कमी मनुष्यबळ असलेल्या अडचणी सांगितल्या. वर्दी चढवल्यावर मिळणार आत्मविश्वास व देशाप्रती असणारे प्रेम पाहुन युवकांनी त्यांना सलामी दिली.



समारोप वेळी अनेकांनी आप-आपली मनोगत व्यक्त केली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे  हे पहिलेच शिबिर होते. ..प्रत्येक वक्त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न   होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर  हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. सुहासदादानी विद्योदयचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला..विनायक दादांनी सर्वांचे आभार मानले..

अनिकेत मधाळे




विद्योदय मुक्तांगण परिवार










                                                 

Thursday 16 February 2017

The Hindu Newspaper covered our stroy

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Not-by-rote-it%E2%80%99s-all-about-learning-through-fun-and-games/article17308565.ece

Wednesday 1 February 2017

सेवांकुर साखर शाळेची सहल..


सेवांकुर साखर शाळेची सहल..

आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं .
सकाळी ठीक ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला "आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास.....?"
आम्हाला भारी वाटलं पण काहीजण  सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                                                                                                                  प्रत्यक्ष २० आली. पाहिल्यादा बालोद्यान भेट घेतली . तेथील मुलांशी संवाद साधला. संपूर्ण बालोद्यान मुलांनी पाहिलं इथं कोण राहायला येणार का असं प्रश्न विचारल्यावर सत्यपाल म्हणाला "मला याचाच पण बाप लावून देणारा नाही" मग काय परत तोच प्रश्न सत्यपाल जर या वस्तीगृहात राहिला तर पुढच्या हंगामाला शेळी कोण सांभाळणार. आणि ऊसाची मोळी कोण बांधणारया प्रश्नची उत्तर कदाचित सत्यपाल कडेच असावीत म्हणून त्याने तसं उत्तर दिलं असावं .बालोद्यान च्या मुलांनी गाणी गाऊन दाखवली .व त्याला उत्तर म्हणून साखर शाळेच्या मुलांनीही गाणी म्हटली.आम्ही फक्त गाणी ऐकत होतो.बस मध्ये
बरीच जागा शिल्लक होती वेळी बालोद्यान मधील १० मुलांन घेऊन बस खिद्रापुरकडे जाण्यासाठी निघालो .  मूलं खूप आनंदी झाली होती. त्यांचा उत्साह गाण्यामधून दिसून येत.

खिद्रपुरला पोहचल्यावर मुलांनी केळीबिस्किटचिरुमुरे यावर ताव मारला . अतिशय अप्रतिम कलाकृती असलेले कोपेश्वर मंदिर मुलांना पाहण्यात काहीच रस नव्हता. दादा मला मंदिरातील घंटा वाजवायची आहे . असं प्रत्येकानी घंटा वाजवली त्यांना मंदिरातील  देवापेक्षा तेथील आता मध्ये असणाऱ्या वटवाघळे पाहण्यात जास्त मज्जा आली. खिद्रापुरचे मंदिरे हा ग्रंथ लिहलेला शशांक दादा चोथे यांनी मुलांना रुचेल अशा शब्दात मंदिराचा इतिहास सांगितला. मंदिर पाहून या असं सांगितलं व परत मुलानं पडलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.मंदिराबद्दल पूर्ण     कोपेश्वर   मंदिर ही कृष्णा नदीच्या घाटावर वसले       आहे  .  त्यामुळे नदीचा किनारी फेरफटका             मारण्यासाठी    आम्ही गेलो . सगळ्यांची पाण्यात हात पाय धुवून    घेतले . इतक्यात मुलांना एक होडी त्या किनाऱ्यावर    येताना दिसली . दादा मला होडीत बसायचं आहे    आम्ही एकदा पण होडीत बसलो नाही.अस सुप्रिया    तिच्या कानडी हेल मराठीत बोलली व सगळ्यांनीच    सूर लावला .मग सगळेच होडीत बसले .थोड भीतच    सगळे होडित चढले,. ”दादा होडीत मी पहिल्याच    बसलो भीती वाटत होती पण सगळे असल्यामुळे भीती पळून गेली ”. अस विशाल शेवटी म्हणाला अशा प्रकारे गटात असणाता भीत पळून जाते त्या  कृष्णा माईन कदाचित विशालला पण सांगितलं. तेथील जेवण व्यवस्था काही शिक्षक मित्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली होती. हे सार शक्य झालं कारण आपण सहलीसाठी केलेली मदत व आमच्यावर दाखवलेला विश्वास व तो असाच कायम राहावा.








Wednesday 11 January 2017

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज



मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

युवा चेतना शिबिराविषयी...



खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!!
आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली.

हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन हाच शिबिराचे स्वरूप . अशा शिबिरासाठी मग असेच कर्मयोगी व्यक्तीना बोलवण्यात आलं होत. ज्यांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नावर आपल आयुष्य वेचल आहे . अशी माणसं शोधन आम्हला थोडं कठीण केलं. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा अशी माणंस आपल्या जवळच आहेत असा अनुभव आला या सर्वाची जगणे, त्यांची जिद्द , निर्धार व अथक प्रत्नानी स्वप्ने साकार करण्याची धडपड त्याचे गोड , कडू अनुभव ऐकून खरच साऱ्या युवकांना चेतना मिळाली याची खात्री झाली.

आमचा हा छोटाचा प्रयन्त होता . पण या छोट्याशा प्रयत्नाला खूप मोठ्या लोकांनी कोणताही मानधन न घेता फक्त एका फोन कॅालवर हजेरी लावली. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून त्यांनी आम्हला वेळ दिला. व आमच्या या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली यातच आम्ही धन्य झालो.

काही तरी खूप मनातून , तळमळीन करायचं ठरवलं ना तर सारा समाज आपल्या मदतीसाठी धावून येतो. याची पुन्हा एकदा प्रचीती आली. बर सगळचं चागलं लिहायचं म्हणुन नाही पण काही गोष्टी शिकायला हि मिळाल्या कोल्हापूर जिल्हाचे उच्चाआयुक्त गप्पा मारायला येणार आहेत तर त्यांना गाडी पाठवायची असते हे आमच्या उत्साही गटाला लक्षात आला नाही. आणि तुम्ही अजून का पोहचला नाही म्हुणन फोन केल्यावर ते म्हणाले मी तुमची वाट पाहत घरी बसलो आलो. आणि आमच्या गरीब टीम कडे चारचाकी गाडी कुणाकडेच नाही. मग गाडीसाठी झालेली धावपळ आमच्या चांगलीच लक्षात राहिली.
असो पण एकंदरीत काही चुका आणि त्यातून शिका हा मूलमंत्र आम्हला मिळाला.सगळ्यांना थोडं बहुत कळावं म्हणून काही शिकण व्यक्त करतोय. जे एक शिबिर संयोजक म्हूनन नाही तर एक शिबिरार्थी म्हणून 

१) सुनील स्वामी सर – अनिसच काम करतांना आलेले अनुभव सांगितले. युवक म्हणून आपण संविधान जगले पाहिजे हा अनुमोल ठेवा दिला . 

२) बागेश्री पोंक्षे ताई – अरुणाचा प्रदेश , उडीसा , शिरवळ, मावळ खोऱ्यातील अनुभव सांगताना अनेक युवक युवतीच्या डोळे पाणावले. व काहीतरी करण्यासाठी आपलं मुठी एवढ काळीज पेटलं पाहिजे हा संदेश दिला 

३) बाबासाहेब नदाफ – अनेक चळवळी , आंदोलने यातून ते कसे घडत गेले त्यातून त्यांचा जीवन प्रवास सांगितला. आंनदी जीवणासाठी पैसे लागत नाहीत हे त्याच्या जीवनातून कळाले.

४) इद्र्जीत देशमुख – प्रशासनात काम करताना आलेल्या अडचणी सांगत, त्यांना कशासाठी जगायचं हे महत्व सांगणारा पक्क्या आमच्या लक्षात राहिला.

५) पाटील सर – जो वाचतो त्याच मस्तक सुधारत व सुधारलेले मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही हाच संदेश युवकांना मिळाला

हे सगळ खूप थोडक्यात लिहल आहे कारण पुढच्या वेळी तुम्हा सगळ्यांना या शिबिरासाठी यायचं आहे.
धन्यवाद

हस्ताक्षर सुधार अभियान




महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांचे खराब हस्ताक्षरांमुळे होणारी नुकसान ओळखून आपण हस्ताक्षर सुधार महाअभियाचे आयोजन केले . तरी कोल्हापूर जिल्हात पहिल्या टप्पात शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातील ५०० विद्यार्थीचे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या.



अक्षरवारी त्रिवेणी संगम- फिरते ग्रंथालय

अक्षरवारी त्रिवेणी संगम


विद्योदय मुक्तागण परिवार, कोल्हापूर , सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान याच्या मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अक्षरवारी या फिरत्या ग्रथालायाचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभा देशमुख याच्या अमृत हस्ते पार पडला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी हाच या फिरत्या ग्रंथालायचा उद्देश आहे.
सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान यांचे यासाठी दिलेले योगदान साठी मनपूर्वक आभार
.

संस्कार सेतू निवासी शिबिर



संस्कार सेतू
सेवा योग सामाजिक प्रतिष्ठान ही कराड मधील आपली सहयोगी संस्थेमार्फत संस्कार सेतू नावाने अतिशय दुर्गम भाग ,जिंती ( ता. पाटण, जि. सातारा ) येथील एका शाळेत ३ दिवशीय निवाशी शिबिर झाले.
या शिबिरात कला व विज्ञान हे विषय घेण्यात आला होता. विज्ञान या विषयाची सत्रे विद्योदय परिवारास देण्यात आली होती. ३ दिवस शिबिरात दाब व ध्वनी या विषयवार विविध प्रयोग व खेळण्यातून मुलांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन , जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयन्त करण्यात आला.
विद्यार्थीकडून येत असलेली उत्तरे भनाट होती.त्याच्या कडूनच आम्ही खूप काही शिकलो. त्याच्या बुद्धीमत्ता सलाम... चिखलातच कमळ उगवते याची प्रचीती जिंती या गावात आली.
सेवायोगी टीम चे आभार त्यांनी विद्योदय परिवारस ही संधी उपलब्ध करून दिली.

ग्रामीण जीवन कौशल्य विकास कार्यक्रम



Problem based learning



आपणास भूक लागते म्हणून जेवण मिळवण्यासाठी सगळे धडपड करत असतात. हा जीवन सृष्टीचा अलिखित नियम आहे. पण थोडा वेगळा विचार शिक्षण क्षेत्रात केला तर असे दिसून येते की सद्या मुलांना आपण जबरदस्तीने काही गोष्टी भरवत आहोत. किंवा असं म्हणता येईल त्यांना शिकण्याची भूक लागत नाही.मग ही शिकण्याची भूक कशी वाढवावी हा विचार झाला. तेव्हा त्या गोष्टीचा मूळ म्हणजे समस्यावर आधारित शिकणे  हा विचार झाला व समस्या आधारित शिक्षण सध्या  आम्ही  देण्याचा प्रयन्त करत आहोत. यासाठी कृतीतून शिक्षण हे तर वापरयचं आहेच. पण या कृती ला समस्येची जोड देणे हा प्रयन्त चालू आहे.

मग समस्या म्हणजे काय ? त्या सोडवण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात ? इथं पासून सुरुवात करून काही कृत्रिम समस्या तयार करून त्या मुलांकडून सोडवून घेण्याचा आम्ही प्रयन्त आहोत. उदा. मुलांना प्लस्टिक गाल्सचा पराशुट, कागदाच घर इ. त्यावर आधारित समस्या  देणे त्या सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमता विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयन्त करत आहोत. आमच्यासाठी सद्या  कोल्हापूर जिल्हातील सहा जिल्हापरिषद मराठी शाळेमध्ये हा उपक्रम सुरु आहे.हा उपक्रम राबताना बरेच चांगले वाईट अनुभव येत आहेत. 

समस्या या विषयाला सुरुवातीला करताना देश , राज्य व गाव व स्व:तच्या आयुष्यातील समस्या हे ब्रेन स्रामिंग मध्ये एका विद्यार्थाने  खाजगी शाळा वाढणे ही समस्या सांगितली मी त्याला  ही समस्या का वाटते असा प्रतीप्रश्न केला तेव्हा समजले.तेव्हा तो म्हणला आम्ही खाजगी शाळेची फी देवू शकत नाही त्यामुळे सरकारी शाळेत शिकतो गेल्यावर्षी माझे बरेच मित्र ही शाळा सोडून गेलेत म्हूनण मला ही समस्या वाटते. अस उत्तर त्याने दिले. त्यां मुलाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. मग आम्हला कामाची  नेमकी दिशा दिसू लागली आहे.

दोन दिवशीय कार्यशाळेने गुणवत्ता वाढ होणार नाही हे नक्की आहे. पण ती शाळा आमच्या प्रकल्पाला पूरक आहे की हीच प्राथमिक पाहणी या दोन दिवशीय कार्यशाळेतून करता आली. आता दीर्घ काळातील कार्यक्रम लवकरच या ग्रामीण सरकारी  शाळामध्ये सुरु करून  गुणवत्ता विकास घडवून आणणे च पुढील ध्येय. !!!

धन्यवाद !!!    



घे भरारी


जानेवारी २०१७ 



Tuesday 10 January 2017

साहित्य लेखन कार्यशाळा


बऱ्याच वेळा मुलांना परीक्षेमध्ये निबंध लिहा, पत्र लिहा इ. प्रश्न विचारून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असा प्रयन्त केला जातो. पण सद्या इतकं सारं तयार साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे की ते पाठ करूनच मुले परीक्षेत लिहित असतात. मग खरच विचार करावासा वाटतो मुलांची प्रतिभा या पाठांतरातून विकसत होणार का ? हे पाठ करून मुल लेखक, कवी होणार का ? ते आपले विचार मुक्त पणे लोकांसमोर ठेवू शकणार का ? की उसने शब्द पाठ करतील ? या सगळ्या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही ज्ञान प्रबोधितच्या छात्र प्रबोधन या अंकाच्या रोप्य महोत्सवचे अवचित्त साधून साहित्य लेखन कार्यशाळा भरवली. इचलकरंजी, अब्दुल लाट व लाटवाटी ३ गावातील इच्छुक ७० मुलांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली.
कार्यशाळा कोठे घ्यायची असा विचार झाला तेव्हा अब्दुल लाट मधील अनाथ मुलांच्या बालोद्यान वसतिगृहात घेवूया असा निर्णय झाला कारण बाकीचे मुले सुद्धा या अनाथ मुलांशी गप्पा मारतील नवे मित्र बनवतील व आपलं व त्याचं आयुष्य जवळून पाहतील हा उद्देश सिद्ध झाला कारण जेव्हा कार्यशालेच्या शेवटी एक मुलीने अनाथ मुले या विषयावर कविता लिहिली.
शब्दाचे खेळ खेळत मुलांनी आपल्या प्रतिभेला बाहेर काढण्याचा प्रयन्त केला. चार ओळीची यमक कविता करतांना मुलांनी खूप मज्जा केली. त्या कवितेना गहरा अर्थ नव्हता किंवा त्या खूप वैचारिकही नव्हत्या पण त्यांनी स्वतः लिहिलेल्या चार ओळी वाचून दाखवताना मुलांच्या चेहऱ्यावरचा स्वनिर्मितचा आनंद पाहून कार्यशाळा घेण्याचा उद्देश सफल झाला अस म्हणायला हरकत नाही.
साखरेत दुध म्हणून मुलांनी ग्रामीण कवी इद्रजित भालेराव  यांच्याशी फोन वरून गप्पा मारल्या.इद्रजित सरांना त्यांची बाप ही कविता गाऊन त्या कवितेच्या आठवणी सांगितल्या. गावातील युवा कवींनी समारोप प्रसंगी आपल्या कविता सादर केल्या.
साहित्या लेखन कार्यशाळेचा आमचा पहिला प्रयन्त यशस्वी झाला असचं म्हणता येईल

सेवांकुर साखर शाळा पालक मिटिंग

नको तोडू माझी शाळा..
.
ऊस तोडणी कामगाराच्या मुलांसाठी साखर शाळा सुरु करून आता महिना होत आला. मुलांसाठी आम्ही करत असलेले कार्य म्हणजे त्या मुलांची शिक्षणातील गोडी टिकवून ठेवणे. त्यासाठी सद्या तरी कृतियुक्त अध्यापन पद्धती,तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे. पण मुलांच्या घडणीसाठी फक्त शाळा काढून उपयोग नाही. शिक्षणाचे महत्व मुलांच्या पालकांनाही समजलं पाहिजे.त्यांचाही वाटा या मुल घडणीच्या प्रकीयेमध्ये खूप महत्वचा आहे याची जाणीव त्यांना करून देण खूप गरजेचं आहे. म्हणून या मुलांच्या पालकांसाठी या साऱ्या गोष्टीची चर्चा व्हावी म्हणून पालक सभेचा आयोजन करायचं असं ठरवलं गेलं.
बऱ्याच शाळेच्या पालक सभामध्ये पालकांची संख्या खूप कमी असते.कारण पालकांना अशा मिटिंग साठी वेळ नसतो. आणि साखर शाळेच्या मुलाच्या पालकांसाठी पालक सभा आयोजित करण म्हणजे एक मोठं आव्हन होत. कारण या मुलांचे पालक हे आपल्या पालावरून सूर्य उगवयच्या आधी ऊस तोडायला जातात व सूर्य मावळ्यावर परत येतात. मग कशी घ्यायची पालक सभा ? तर त्याच्या वेळेनुसार रात्री ८.०० ते १०.०० शी पालक सभेची वेळ निश्चित झाली. या कामगारांना पालक सभेला या सांगून ते येणार नाहीत.मग त्यासाठी युक्ती म्हणून शिक्षणाचे महत्व सांगणारा, आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलीला शिकणाऱ्या बाप व मुलीचा तानी हा मराठी सिनेमा दाखवायचं असं ठरवलं गेलं. आणि इंटरवल मध्ये पालकाशी संवाद साधता येईल असा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
८०- ९० ऊस तोडी मजुर ला पालक सभेसाठी उपस्थित होते .आमच्या टीम साठी ही आनंदाची गोष्ट होती. पाहिलास शो हाउस फुल. इंटरवल मध्ये पालकाशी साधलेला सवांद खूप महत्वाचा ठरला. आणि सिनेमाच इतका मार्मिक होता. की शिक्षणासाठी लढणाऱ्या तानीला पाहून सगळ्याचं पालकांचे डोळे ओले झाले. आम्ही आमच्या मुला- मुलीला शाळा शिकणार अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. आणि आमची पालक सभा यशस्वी झाली.