Sunday 17 September 2023

बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा

बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा

मागील आठवड्यात विद्योदय कोअर टीमचा तीन दिवसांचा अभ्यास दौरा पालघर जिल्ह्यातील Quest, ग्राममंगल व  ,बाल ग्राम शिक्षा केंद्र या तीन  संस्थेचा झाला. बालशिक्षणात उत्तम काम करणाऱ्या या भारतातील काही अग्रगण्य संस्था आहेत. त्याचा थोडक्यात वृत्तात.

दिवस पहिला - 11 सप्टेंबर ,2023 

Quest -Quality Education support Trust -

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ निलेश निमकर सर यांच्या Quest संस्थेची भेट...

कोल्हापूर - ठाणे - वाडा - सोनाळे असा बसचा 10 तासांचा प्रवास करत आम्ही सोनाळे गावात पोहचलो. आमच्याच वयाच्या हिमानी ताई आम्हला पुढील दोन दिवस Quest चं काम दाखवणार होत्या. हिमानी ताई रत्नागिरी जिल्ह्यातील, गेल्या वर्षी त्यांनी ताराबाई मोडक फेलोशिप पूर्ण केली . काम आवडलं म्हणून आता त्या याचं फेलोशिप कार्यक्रमाच्या समनव्यक म्हणून काम पाहतात. त्यांच्याशी बोलताना सहज प्रश्न विचारला ताई तुमचे पुढील प्लन काय आहेत. तर त्यांनी उत्तर दिलं. Life time Quest बरोबर काम करण्याची इच्छा आहे. इतका चांगला अनुभव माझा आहे. ताईच्या या उत्तरामुळे Quest च्या कामाचं culture लक्षात आलं.  इथं लोक नोकरीसाठी येतं नाहीत तर कामातुन मिळणाऱ्या आनंदासाठी , समाधानासाठी येतात हे ताईच्या बोलण्यातून लक्षात आले.

पालवी प्रकल्प - हिमानी ताईंनी आम्हाला Quest चा   पालवी प्रकल्प  दाखवला . जो अंगणवाडी सेविकांच्या क्षमता संवर्धनासाठी खास तयार केला आहे. गर्द झाडीतून , निमुळत्या वाटेने आम्ही एका आदिवासी पाड्यावर चालू असणाऱ्या अंगणवाडीला भेट दिली . ममता ताई तिथं मुलांना शिकवत होत्या. सोबत पालवी प्रकल्पाचा संतोष दादा तिथं ताईंनी मदतीसाठी उपस्थित होता. फक्त प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष वर्गातील मदतीवर भर हे Questच्या कामाचे वेगळेपण आम्हाला जाणवले .समोर 10 -12 मुले ममता ताई समोर होती. या अंगणवाडी वर्गाची रचना खूप वेगळी होती. जागोजागी वेगवेगळ्या सूचना देणारे पोस्टर लावले होते. इथे सुशोपण करूया , चपला रांगेत काढुया, गिरगीट फळा ,बाहुली घर , मुक्त खेळ कोपरा , हवामान आलेख ,दैनिक नियोजन इ. अनेक बाबीनी संपूर्ण वर्ग सजला होता.ममता ताई अतिशय आत्मविश्वास पूर्वक मुलांशी संवाद साधत होत्या. अनेक शैक्षणिक साधनांचा वापर अंगवाडीत केला जाऊ शकतो . व मुलांना अतिशय सूंदर शैक्षणिक अनुभव देता येतात व हे 1 तासाच्या निरीक्षणातून आम्हला समजले. 

बालभवन प्रकल्प  - 

हिमाई ताईंनी सोबत आमच्या सर्वांचा जेवणाचा डब्बा आणला होता. रात्रभर बसचा प्रवास त्यामुळे दुपारी डोळ्यात झोप होती . आता जेवण करून थोडं कुठंतरी आडवं होऊ (झोपू ) असा विचार मनात असताना हिमानी ताईंनी आम्हला चला आता बालभवनचा वर्ग बघूया ! म्हणून आम्हाला जाग केल . कामात बदल हीच विश्रांती हे कदाचित ताईंनी माहीत असावं बहुतेक. एका आश्रमच्या परिसरात मैदानातील एका कोपऱ्यात दोन कंटेनर होते. इथे बालभवनातील मुलांचे वर्ग भरतात . इयत्ता 1 ली ते 4 थी च्या मुलांनी आपल्या शाळेच्या वेळातील पाऊण तास या बालभवन यायचं व कृतीयुक्त भाषा व गणिताचा तास अभ्यास  वर्गाची रचना पालवी प्रकल्पातील अंगणवाडी सारखीच पण प्रत्येक गोष्टीचा स्थर हा वाढवलेला. बालभवनातील दादा 3 री च्या  मुलाना शाब्दीक उदाहरण शिकवत होता.  मुलांना प्रत्यक्ष विविध कृती करून , विविध साधनांचा वापर करून तो दादा गणित शिकवत होता. प्रत्येक मुलांला संकल्पना समजली पाहिजे  हे त्याच्या शिकवण्याचे सूत्र होते.


 

अनुपद सक्षम प्रकल्प

बालभवनचा  तास पाहिल्यावर आम्ही त्याच आश्रम शाळेतील इयत्ता 5 वी ते 7 वी च्या भाषा व गणित विषयात मागे असणाऱ्या मुलांचा सक्षम प्रकल्पाचा तास पहिला . भाषा व गणितात मागे याचा अर्थ असा नव्हे की फक्त लिहण्या वाचण्यातील अडचण ,गणितातील अंकओळख , मूलभूत क्रिया असा न घेता. मराठी भाषा म्हणून मुले समृद्ध झाली पाहिजे . गणित संकल्पना कृतीतुन स्पष्ट झाल्या पाहिजेत. मुले भाषा व गणितात सक्षम झाली पाहिजेत असाच तेथील ताई दादांच्या बोलण्यातून आम्हाला समजले.

दिवसभर भटकंती करून गर्द झाडीतून प्रवास करत आम्ही शेवटी Quest च्या सोनाळे येथील ऑफिस मध्ये पोहोचलो. चहापान झाल्यावर Quest ने विविध प्रकल्पासाठी  तयार केलेल्या  शैक्षणिक साधने ,पुस्तके यांचे प्रदर्शन आमच्यासाठी लावले  होते. कोणताही कार्यक्रम तेव्हाच समृद्ध होतो जेव्हा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार झालेलं  ज्ञान पुढच्या पुढीला साहित्य रूपांने उपलब्ध होते. Quest ने प्रत्येक कार्यक्रमाचे उत्तम दर्जेजाचे साहित्य शैक्षणिक साहित्य व पुस्तके यांची निर्मिती केली आहे ..दिवसभराचा वृत्तांत आम्ही नितीन विशे सरांना सांगितला व आमचा पहिला दिवस पूर्ण झाला .

क्रमश: 

आपला 

विनायक 

१७ जुलै , २०२३ 





Tuesday 10 October 2017

पाऊली चालती मेळघाट ची वाट !!! 

सृजन यात्रा – २०१७

माहित नाही पण मला मेळघाट ने जीवनाचा मेळ कशात आहे याची जाणीव करून दिली तर  घाट सांगून गेला तूला  आयुष्यची खूप वळण बघायची आहेत. माझा सृजन यात्रेच दुसरा अनुभव !!! प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. याची पुन्हा प्रचीती परत आली.

मेळघाट म्हटलं की सगळयांना आठवतो महाराष्ट्रतला वेगवेगळ्या प्रश्नांनी व्यापलेला  प्रदेश जिथे  कुपोषण, बालमृत्यु , वेगवेगळे साथीचे रोग, अंधश्रद्धाळू आदिवासी लोक, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, बंद  पडलेल्या शाळा, घनदाट जंगल आणि घाटाचा रस्ता. पण माझ्या नजरेतून पाहिलेला मेळघाट थोडा वेगळा होता.


आपल्याकडे नद्या वाहत आहेत पण पाणी प्रदुषित. आपल्याकडे घर आहेत पण त्यात इतरांना प्रवेश नाही. आपल्याकडे पंचतारांकित हॉटेल आहेत पण पौष्टिक आहार नाही. आपल्याकडे आधुनिक वैद्यकीय साधने आहेत पण त्यात गरिबाचे उपचार नाकारले  जातात. आपल्याकडे मुलांना शिक्षण दिले जात पण पाचवीचा मुलाला पहिलीच वाचता येत नाही सांगणारा असर अहवाला निघतो. मग मागास कोण ?? आपण का ते असा प्रश्न मनात येवून जातो.
सृजन यात्राते भेटलेल्या प्रत्येक Role मॉडेल आंम्हाला हेच सांगत होता की इथं आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न आहेत. आम्ही ते सोडवयाला आलो खरे पण याच लोकांनी आम्हाला खूप काही शिकवले.जीव लावणे म्हणजे काय असत हे डॉ. रवींद्र कोल्हे सांगत होते. आदिवासी लोकांनी त्यांना बाधून दिलेलं घर. त्याच्या मुलांची घेतलेली  काळजी, ते M.D करण्यासाठी बैरहगड सोडताना चाळीस किमी अंतर सपूर्ण गाव सोडायला हरिसाल या बस असणाऱ्या गावात पर्यत आला हे सांगताना त्यांना गहिवरून आले.

डॉ. आशिष सातव यांच्या महान ट्रस्ट च्या  कधीही शाळेत न गेलेल्या पण उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिलांनी तर आमच्या सगळ्याची मने जिंकून घेतली.व जीवन शिक्षणाचा नवा मंत्र आम्हा यात्रेकरूना आला. चिलाटी सारख्या अतिदुर्गम भागात मेळघाट मित्रच काम सुरु आहे रामभाऊ, मधुभाऊ, चंदूभाऊ जाऊन इथे राहतात व धडक मोहिमेच्या माध्यामातून अनेक युवकांना स्वत:ला ओळखण्याची संधी उपलब्ध करून देतात. बोकोमित्र व आयोग्य मित्र व गावमित्र बनवून आदिवासी कोरकू मित्रांना सक्षम करतात.हे मित्र जेव्हा सरकारी यंत्रणा विरुद्ध बंड पुकारतात तेव्हा खऱ्या चळवळची परिभाषा कळली.

ज्यांना समाज्यान नाकारलं अशा अनाथ मतीमंद मुलांना एकत्रीत  करून एकही कामगार न ठेवता १२३ मुलाचा बाप बनणारा शंकरबाबा पापळकर हे सांगत होते एक समाजसेवा करायची असेल तर पुर्नवसन महत्वाचे आहे.त्यांनी अशा मुला-मुलीची लग्न करून दिली.हे पाहून परत समाजसेवेचा अर्थ नव्याने कळल.

आदिवासी भुकेन मरत नाहीत तर अन्यायने मरतात.यासाठी त्यांना कायदाचे हक्क मिळवून देणारी खोज संस्थेने अजून  एक बाजू आमच्यासमोर ठेवली. समाज सेवाची वेगवेगळी अंगे असतात. जशी गरज आदीवासी भागात आहे. तशी शहरात सुद्धा माणस आहेत व त्यांनाही मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचे काम डॉ. अविनाश सावजी सर प्रयास सेवांकुर च्या माध्यामातून करत आहे. आणि स्व:ताची नोकरी सरकरी शाळेची नोकरी सोडून फासेपारधी समाजाचा युवक मतीन भोसले याने  ज्यांना समाजाने चोर म्हणून वाळीत टाकल ज्यांना राहयाला घर नाही, खायला अन्न नाही, घालायाला कपडे नाहीत अशा अनेक प्रश्नची उत्तरे शिक्षणाच्या माध्यामातून सोडवण्यासाठी ४४६ मुलामुलांची प्रश्नचिन्ह शाळा याला नक्कीच उत्तर बनेल. असं ती शाळा पाहून वाटते .मेळघाटामध्ये  आम्हला वाघ भेटला नाही पण वाघाच्या तोलामोलाची काम करणारी ढाणे वाघ प्रवृतीची  माणसे नक्की भेटली अस म्हणायला हरकत नक्कीच नाही. 

या प्रत्येक व्यक्तीच्या कामाबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिता येईल.पण वाचून हा अस्पर्शित भागाचा स्पर्श कळणार नाही.एकदा अवश्य भेट द्या.तुम्ही जरूर म्हणाल पाऊली चालती मेळघाट ची वाट !!!

धन्यवाद !!!
विनायक माळी
विद्योदय मुक्तांगण परिवार, कोल्हापूर


Tuesday 30 May 2017

युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७


   युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७
 मी कडून...आम्ही कडे नेणारा रोमांचकारी प्रवास...

विद्योदय मुक्तांगण परिवारमार्फत दरवर्षी युवा चेतना निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.. हे शिबिराचे ३ रे वर्ष होते..

खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात .आयुष्यात काही तरी वेगळे, काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठीसुद्धा काहीतरी करावे असे बऱ्याच जणांना वाटत असते

आजच्या युवकांना प्रशासकीय, उद्योजक, संरक्षक व शेती क्षेत्रात यशस्वी झालेल्या व उत्तम कार्य करत असलेल्या व्यक्तीचा जीवन प्रवास समजावा, त्यांचा युवकांशी सवांद व्हावा व त्यांतून युवकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी या हेतूने युवा चेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले . हे दोन दिवशीय निवासी शिबीर दि.२७ व २८ मे २०१७ रोजी बालोद्यान या वसतिगृहात पार पडले. सदर शिबीरामध्ये ५० युवकांचा समावेश होता. शिबीराचा थोडक्यात वृत्तांत पुढील प्रमाणे
 वकांना सामाजिक
दिवस पहिला २७ मे , २०१७
    शिबिराचा दिवस म्हणजेच शनिवार २७ मे उजाडला. हळू-हळू शिबिरार्थींची नोंदणी सुरु झाली.१०.३० पर्यंत नोंदणी करून सर्व दादा-ताई बालोद्यान मध्ये एकत्र जमले. ओंकाराने शिबिराची सुरुवात झाली. विनायक दादाने एक खेळ घेतला त्या खेळामध्ये सर्वांची ओळख झाली..


 पहिले सत्र -  मा. बाबासाहेब नदाफ
अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे ज्यांनी संपूर्ण भारतभर व्याख्यानासाठी प्रवास करणारे राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री, हेरवाड गावचे सुपुत्र मा.बाबासाहेब नदाफ सर यांचे हेरवाड सारख्या लहान गावातून जन्म घेवून राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री असा प्रवास सरांनी ठेवला. त्यांची समजाप्रती असणारी तळमळ, तिहार जेल मध्ये त्यांची साजरी केलेली भगतसिंगची जयंती असा सगळा प्रवास एकूण सगळे साजरी केलेली माहिती दिली. लहानपणी केलेला संघर्ष यापासुन नक्कीच प्रेरणा मिळाली.



दुसरे सत्र- सौ पद्मावती संजय गिरमल
  आपल्या स्वकर्तुत्वाने आज त्या लाट गावातील यशस्वी आधुनिक महिला शेतकरी म्हणून परिचित आहेत..एखादे ध्येय ठरवायचे व ते पूर्ण करण्यासाठी खुप कष्ट करायचे हा मूलमंत्र त्यांनी सर्व दादा-ताईंना दिला. शेती व्यवसाय हा महत्वाचा आहे. जर डोक वापरून शेती केली तर त्याच्या सारखे उत्पन्नाचे साधन नाही अशी नवी दिशा त्यांनी युवकांना  दिली.



पारंपारिक खेळ -

जे खेळ कुठेतरी काळाच्या आड हरवत चालले आहेत असे खेळ सर्वांनी मिळून गटा-गटामध्ये खेळले .खेळामध्ये विटी-दांडू, लगोरी, रस्सीखेच या खेळांचा समावेश होता.सगळ्यांना आपले बालपण आठवले.



तिसरे सत्र – मा.इंद्रजीत देशमुख व गोरख माळी सर
      

सर्व जण या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते..कारण होते हि तसेच. ज्यांना आम्ही आदर्श स्थानी मानतो,आपल्या अमृत वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे,प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी,काकाजी म्हणजेच डॉ.इंद्रजीत देशमुख (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प.,कोल्हापूर) आणि त्यांच्या सोबत होते आयर्न मॅन हा सन्मान दोनवेळा प्राप्त करणारे गोरख माळी सर काकाजी व माळी सरांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला.. या सत्रासाठी 7 वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या युवकापर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती..त्यामध्ये आपले लाडके पण तितकेच शिस्तप्रिय असणारे मुख्याद्यापक गडकरी सर,साहित्यिक कुरुंदवाडे सर हे युवक युवा शिबिरासाठी आवर्जून उपस्थित होते..सलगतीन तास सगळे एका जागी खिळून होते..


मनोरंजन सत्र -
      रात्री भोजन करून परत दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो. तयारी झाल्यानंतर अक्षय दादांनी आपल्या कवितेने सर्वांना भारावून सोडले..


दुसरा दिवस- रविवार २८ मे

 एरोबिक  -
  सकाळी ठीक ६ वाजता नदाफ सर बालोद्यान मध्ये हजर होते.. सरांनी सर्वांना अप्रतिम पध्द्तीने एरोबिक शिकवले. संगीताच्या तलावार व्यायाम करताना युवकांनी खूप आनंद घेतला. सरांनी  व्यायाम व एरोबिक चे महत्व सांगितले.






लाटी काटी व दांडपट्टा प्रशिक्षण -गावातील देवा फौंडेशन मार्फत लाठी-काठी व दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक चौगुले यांनी अप्रतिम पद्धतीने दिले.लाटी व दांडपट्टा मुलीच्या हाती भारी शोभत होत्या.२१ शतकातल्या रणरणरागिणी जणू...

    



श्रमदान – बालोद्यान च्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व बालोद्याच्या मुलाच्या सायकली ठेवण्यासाठी मोडकळीस आलेला पत्राचा शेड दुरुस्त करण्यात आला . त्यानंतर श्रमदान करून झाल्यावर आवरून नाष्टा करून सर्वजण १०.०० वाजता एकत्र जमलो.




प्रभातभेरी  -
युवा शक्तीचे महत्व सांगणारी , युवकांना दिशा देणारी घोषवाक्ये लिहून गावात प्रभातफेरी काढण्यात आली.युवा वर्गाला संघटित करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या.





 सत्र चौथे - बळवंत नायकूडे व श्रीकांत प्रभुदेसाई  
  सामाजिक उद्योजकता यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इचलकरंजीचे प्रसिद्ध उद्योजक मा.श्रीकांत प्रभू देसाई सर व लाटेतील गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष मा.गणेश नायकुडे सर उपस्थित होते... दोघांनी आपला जीवनप्रवास सांगितला..
आपण व्यवसाय करत समाजसेवा करू शकतो. व नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनले पाहिजे हा मुलंमंत्र त्यांनी दिला.

सत्र पाचवे – अभिजित कुंभोजे
अब्दुल लाट गावातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असेलले अभिजित कुंभोजे व त्यांच्या साथीदारांनी संरक्षण क्षेत्रातील संधी सांगितल्या व सद्या संरक्षण क्षेत्रात कमी मनुष्यबळ असलेल्या अडचणी सांगितल्या. वर्दी चढवल्यावर मिळणार आत्मविश्वास व देशाप्रती असणारे प्रेम पाहुन युवकांनी त्यांना सलामी दिली.



समारोप वेळी अनेकांनी आप-आपली मनोगत व्यक्त केली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे  हे पहिलेच शिबिर होते. ..प्रत्येक वक्त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न   होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर  हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. सुहासदादानी विद्योदयचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला..विनायक दादांनी सर्वांचे आभार मानले..

अनिकेत मधाळे




विद्योदय मुक्तांगण परिवार










                                                 

Thursday 16 February 2017

The Hindu Newspaper covered our stroy

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Not-by-rote-it%E2%80%99s-all-about-learning-through-fun-and-games/article17308565.ece

Wednesday 1 February 2017

सेवांकुर साखर शाळेची सहल..


सेवांकुर साखर शाळेची सहल..

आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं .
सकाळी ठीक ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला "आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास.....?"
आम्हाला भारी वाटलं पण काहीजण  सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                                                                                                                  प्रत्यक्ष २० आली. पाहिल्यादा बालोद्यान भेट घेतली . तेथील मुलांशी संवाद साधला. संपूर्ण बालोद्यान मुलांनी पाहिलं इथं कोण राहायला येणार का असं प्रश्न विचारल्यावर सत्यपाल म्हणाला "मला याचाच पण बाप लावून देणारा नाही" मग काय परत तोच प्रश्न सत्यपाल जर या वस्तीगृहात राहिला तर पुढच्या हंगामाला शेळी कोण सांभाळणार. आणि ऊसाची मोळी कोण बांधणारया प्रश्नची उत्तर कदाचित सत्यपाल कडेच असावीत म्हणून त्याने तसं उत्तर दिलं असावं .बालोद्यान च्या मुलांनी गाणी गाऊन दाखवली .व त्याला उत्तर म्हणून साखर शाळेच्या मुलांनीही गाणी म्हटली.आम्ही फक्त गाणी ऐकत होतो.बस मध्ये
बरीच जागा शिल्लक होती वेळी बालोद्यान मधील १० मुलांन घेऊन बस खिद्रापुरकडे जाण्यासाठी निघालो .  मूलं खूप आनंदी झाली होती. त्यांचा उत्साह गाण्यामधून दिसून येत.

खिद्रपुरला पोहचल्यावर मुलांनी केळीबिस्किटचिरुमुरे यावर ताव मारला . अतिशय अप्रतिम कलाकृती असलेले कोपेश्वर मंदिर मुलांना पाहण्यात काहीच रस नव्हता. दादा मला मंदिरातील घंटा वाजवायची आहे . असं प्रत्येकानी घंटा वाजवली त्यांना मंदिरातील  देवापेक्षा तेथील आता मध्ये असणाऱ्या वटवाघळे पाहण्यात जास्त मज्जा आली. खिद्रापुरचे मंदिरे हा ग्रंथ लिहलेला शशांक दादा चोथे यांनी मुलांना रुचेल अशा शब्दात मंदिराचा इतिहास सांगितला. मंदिर पाहून या असं सांगितलं व परत मुलानं पडलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.मंदिराबद्दल पूर्ण     कोपेश्वर   मंदिर ही कृष्णा नदीच्या घाटावर वसले       आहे  .  त्यामुळे नदीचा किनारी फेरफटका             मारण्यासाठी    आम्ही गेलो . सगळ्यांची पाण्यात हात पाय धुवून    घेतले . इतक्यात मुलांना एक होडी त्या किनाऱ्यावर    येताना दिसली . दादा मला होडीत बसायचं आहे    आम्ही एकदा पण होडीत बसलो नाही.अस सुप्रिया    तिच्या कानडी हेल मराठीत बोलली व सगळ्यांनीच    सूर लावला .मग सगळेच होडीत बसले .थोड भीतच    सगळे होडित चढले,. ”दादा होडीत मी पहिल्याच    बसलो भीती वाटत होती पण सगळे असल्यामुळे भीती पळून गेली ”. अस विशाल शेवटी म्हणाला अशा प्रकारे गटात असणाता भीत पळून जाते त्या  कृष्णा माईन कदाचित विशालला पण सांगितलं. तेथील जेवण व्यवस्था काही शिक्षक मित्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली होती. हे सार शक्य झालं कारण आपण सहलीसाठी केलेली मदत व आमच्यावर दाखवलेला विश्वास व तो असाच कायम राहावा.








Wednesday 11 January 2017

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज



मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

युवा चेतना शिबिराविषयी...



खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!!
आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली.

हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन हाच शिबिराचे स्वरूप . अशा शिबिरासाठी मग असेच कर्मयोगी व्यक्तीना बोलवण्यात आलं होत. ज्यांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नावर आपल आयुष्य वेचल आहे . अशी माणसं शोधन आम्हला थोडं कठीण केलं. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा अशी माणंस आपल्या जवळच आहेत असा अनुभव आला या सर्वाची जगणे, त्यांची जिद्द , निर्धार व अथक प्रत्नानी स्वप्ने साकार करण्याची धडपड त्याचे गोड , कडू अनुभव ऐकून खरच साऱ्या युवकांना चेतना मिळाली याची खात्री झाली.

आमचा हा छोटाचा प्रयन्त होता . पण या छोट्याशा प्रयत्नाला खूप मोठ्या लोकांनी कोणताही मानधन न घेता फक्त एका फोन कॅालवर हजेरी लावली. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून त्यांनी आम्हला वेळ दिला. व आमच्या या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली यातच आम्ही धन्य झालो.

काही तरी खूप मनातून , तळमळीन करायचं ठरवलं ना तर सारा समाज आपल्या मदतीसाठी धावून येतो. याची पुन्हा एकदा प्रचीती आली. बर सगळचं चागलं लिहायचं म्हणुन नाही पण काही गोष्टी शिकायला हि मिळाल्या कोल्हापूर जिल्हाचे उच्चाआयुक्त गप्पा मारायला येणार आहेत तर त्यांना गाडी पाठवायची असते हे आमच्या उत्साही गटाला लक्षात आला नाही. आणि तुम्ही अजून का पोहचला नाही म्हुणन फोन केल्यावर ते म्हणाले मी तुमची वाट पाहत घरी बसलो आलो. आणि आमच्या गरीब टीम कडे चारचाकी गाडी कुणाकडेच नाही. मग गाडीसाठी झालेली धावपळ आमच्या चांगलीच लक्षात राहिली.
असो पण एकंदरीत काही चुका आणि त्यातून शिका हा मूलमंत्र आम्हला मिळाला.सगळ्यांना थोडं बहुत कळावं म्हणून काही शिकण व्यक्त करतोय. जे एक शिबिर संयोजक म्हूनन नाही तर एक शिबिरार्थी म्हणून 

१) सुनील स्वामी सर – अनिसच काम करतांना आलेले अनुभव सांगितले. युवक म्हणून आपण संविधान जगले पाहिजे हा अनुमोल ठेवा दिला . 

२) बागेश्री पोंक्षे ताई – अरुणाचा प्रदेश , उडीसा , शिरवळ, मावळ खोऱ्यातील अनुभव सांगताना अनेक युवक युवतीच्या डोळे पाणावले. व काहीतरी करण्यासाठी आपलं मुठी एवढ काळीज पेटलं पाहिजे हा संदेश दिला 

३) बाबासाहेब नदाफ – अनेक चळवळी , आंदोलने यातून ते कसे घडत गेले त्यातून त्यांचा जीवन प्रवास सांगितला. आंनदी जीवणासाठी पैसे लागत नाहीत हे त्याच्या जीवनातून कळाले.

४) इद्र्जीत देशमुख – प्रशासनात काम करताना आलेल्या अडचणी सांगत, त्यांना कशासाठी जगायचं हे महत्व सांगणारा पक्क्या आमच्या लक्षात राहिला.

५) पाटील सर – जो वाचतो त्याच मस्तक सुधारत व सुधारलेले मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही हाच संदेश युवकांना मिळाला

हे सगळ खूप थोडक्यात लिहल आहे कारण पुढच्या वेळी तुम्हा सगळ्यांना या शिबिरासाठी यायचं आहे.
धन्यवाद